राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २० ऑगस्टपासून राज्यात सर्व स्तरावर राबविण्यात येणार
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2022-23 या वर्षाकरिता दि.20 ऑगस्ट पासून राज्यात सर्व स्तरावर राबविण्यात येत आहे.
दि.03 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार या योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी दि.16 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” पोर्टल विकसित करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळाची लिंक pragatibhiyan.maharashtra.gov.


