साखर कारखान्याचे FRP प्रमाणे भाव जाहीर करावे व ऊस तोडणीत नियमितात यावी या साठी नवतरुण शेतकऱ्यांन मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

0

साखर कारखान्याचे FRP प्रमाणे भाव जाहीर करावे व ऊस तोडणीत नियमितात यावी या साठी नवतरुण शेतकऱ्यांन मार्फत जिल्हाधिकारी यांना
 निवेदन 

उस्मानाबाद :-  जिल्ह्यातील साखर कारखाचे दोन महिन्यापासून ऊस गाळप हंगामा
 सुरू होऊन आजपर्यंत कोणत्याही कारखान्याने यावर्षीचा भाव जाहीर न केल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे भाव जाहीर करावा व त्याच बरोबर सर्व कारखान्यांकडून ऊस तोडीचे नियोजित कार्यक्रम पाळले जात नाहीत व शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत त्यास त्यांनी लवकर सुसूत्रता आणावी ही विनंती . अशी मागणीचे निवेदन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

यावेळी नवतरुण शेतकरी ,
राकेश सुर्यवंशी , गणेश गुटे , निखिल पडवळ , हर्षल डोके , तांबोळी सिद्दीक , संभाजी भोयटे , अक्षय सुर्यवंशी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top