लोहारा /प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रत्येक व्यक्तीने कंबर कसली पाहिजे तन, मन, धनाने आपले गाव कोरोना मुक्त करण्यासाठी खंबीर पणे लढले पाहिजे. बेफिकीरपणा आणि बिनधास्तपणाला मुरड घातल्यास कोरोनावर नकीच मात करता येईल असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय व निवासी अपंग शाळा सास्तूरच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहकार्याने जि प सदस्या श्रीमती शीतलताई राहुल पाटील व राहुल पाटील यांच्या पुढाकाराने कोरोना संबंधित नियामंचे काटेकोरपणे पालन करीत सास्तूर गावातून कोरोना विषयी जनजागृती रूट मार्च काढण्यात आला. अफवांना बळी न पडता सर्व कामे बाजूला ठेऊन सर्वांनी आधी कोरोना लस घ्यावी असे आवाहन जि.प.सदस्या शीतलताई पाटील यांनी केले. तसेच लसीच्या दोन्ही मात्र घेतलेल्या नागरिकांना जरी कोरोना संसर्ग झाला तरी त्यांचे प्राण १०० टक्के वाचणार आहेत व रुग्ण गंभीर होणार नाही, त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केला. ज्यांनी ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी लस घेतल्यानंतर देखील कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क वापरावा सतत हात धूत राहावे, दोनव्यक्ती मध्ये किमान ६ फुट अंतर ठेवावे. रस्त्यावर थुंकू नये शक्यतो कौटुंबिक कार्यकर्म टाळावे. एवढे करता असताना लसीचे २ डोस घेऊनहि कोरोनाची लागन झालीच तर त्यांची तीव्रता खूप नसते व तो लगेच बरा होतो त्यामुळे ४५ वर्षा वरील व्यक्तींनी आवर्जून लस घ्यावी असे आवाहन राहुल पाटील यांनी केले. तसेच बरेच नागरीक अजूनही आजार अंगावर काढतात दवाखान्यात जायला व कोरोनाची तपासणी करायला घाबरतात त्यांनी न घाबरता दवाखान्यात येऊन तपासणी करून घ्यावी, तपासणी करून जरी एखादी व्यक्ती कोरोना Positive आली तर कोविड केअर सेंटरला सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि जर घरी काळजी घेण्यासाठी रुग्णांची इच्छा असेलतर त्यासाठीच्या नियमांचे पालन करून ग्रह विल्गीकारणात राहावे आर.बी.जोशी यांनी आपल्या आवाहनपर भाषणात माहिती दिली. ते म्हणाले कि रुग्णांनी घरी कोरोना उपचार करून घेण्यासाठी काही शासकीय नियम आहेत. त्यात घरी राहणाऱ्या कोरोना बधीताला हवा खेळती असलेल्या स्वतंत्र खोलीत राहावे लागेल रुग्णाने नेहमी ट्रिपल लेअर मास्क वापरावा दर आठ तासांनी हा मास्क बदलावा. रुग्णांनी जेवणात सकस आहाराचा समावेश करावा पुरेशी झोप घ्यावी. दर चार तासांनी तपासणी, दिवसातून ३ वेळा SPO2 तपासणी कारवी. रुग्णाने वापरलेल्या वस्तू नियमितपणे निर्जंतुक कराव्यात. रुग्णाने दिवसातून २ वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या व वाफ घ्यावी श्वसनास त्रास, SPO2 ९४ च्या खाली असल्यास त्वरित दवाखान्यात जावे. होम आयसोलेशन संपल्यावर परत चाचणीची गरज नाही इत्यादी गोष्टीची माहिती रमाकांत जोशी यांनी गावकर्यांना दिली.
उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सास्तूर गावात चालू असणाऱ्या माझे गाव माझे कुठुंब अभियाना अंतर्गत सर्वेक्षनाचा आढावा घेऊन सर्व पर्यवेक्षकानी वेळोवेळी रुग्णाची तपासणी करावी व लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ताबडतोब दवाखान्यात तपासणीसाठी पाठवावे. त्याच बरोबर त्यांनी सर्वांशी सवांद साधून लॉकडॉउनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांचावर कारवाही करावी, असे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कठारे यांनी नागरिकांना असे आवाहन केले कि, गावकऱ्यांनी आपल्या गावात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घेऊन ग्राम कोरोना मुक्त समित्या बळकट कराव्यात तसेच लस घेतल्या नंतर तीन महिने रक्तदान करता येणार नाही त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊ शकतो हा संभाव्य धोका ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
या कोरोना विषयक रूट मार्चची सांगता ग्रामपंचायत कार्यालय सास्तूर येथे करण्यात आली रूट मार्चमध्ये उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, लोहारा तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कठारे, जि.प.सदस्या सौ.शीतलताई राहुल पाटील, राहुल पाटील, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, ग्रामसेवक डी.आय.गोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, तालुका केद्र प्रमुख एम.जी.वाघमोडे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक मस्के गावातील सर्व संघटनाचे प्रमुख, तंटामुक्ती समिती सदस्य, अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.