शेतकरी कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोहारा तालुक्यातील जेवळी येथील शेतकरी कुटुंब आमरण उपोषण करत आहे.
लोहारा तालुक्यातील मौजे . जेवळी ( उत्तर ) गट क्र . २५७ चा फेरफार होवु नये म्हणुन अर्ज देवुनसुध्दा सदरील गट क्रमांकाचा फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकरी कुटुंबांने केली आहे. गट नं . २५७ चा फेरफार होवू नये म्हणून मा . जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी , उमरगा , तहसिलदार साहेब , लोहारा , मंडळ अधिकारी साहेब , जेवळी व तलाठी यांना फेरफार करू नये म्हणून अर्ज देवुनसुध्दा गट नं . २५७ चा फेरफार करण्यात आलेला आहे . तरी याची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी व मौजे जेवळी येथील रहिवासी सरोजिनी गुणवंत कारभारी यांच्यावर सावकारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कुटुंबासह कुटुंबासह 25 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत या उपोषणात काही अनुचित प्रकार व जिवीत हानी घडल्यास सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल निवेदन आज 25 मे रोजी उपोषणाला बसताना शेतकरी कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे व उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला फकीरा ब्रिगेड च्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी फकीरा ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, विश्वनाथ हावळे, शिल्पा हावळे, श्यामल हावळे ,हनुमंत हावळे ,कमलाकर हावळे उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
मे २६, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा