उस्मानाबाद शहरात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; पुर्ण शहरात कारवाई करण्याची नागरिकांची मागणी !
उस्मानाबाद :- शहरात “मनाई आदेश झुगारुन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर आनंदनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी आहे. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन अब्दुल रहेमान शमशाद काझी, रा. साईनगर, उस्मानाबाद यांनी दि. 06.11.2020 रोजी 23.40 वा. सु. साईनगर येथील एस.के.टी. हाऊस येथील गाळ्यात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करत असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोउपनि- श्री ज्ञानेश्वर सानप यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 272, 273 आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा आज दि. 07.11.2020 रोजी नोंदवला आहे. याच प्रमाणे शहरात ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रमाणात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे त्यासाठी शहरांमध्ये विशेष मोहीम राबवून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणार्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सकाळी लवकर उठणार काही नागरिकांनी नगरपालिकेच्या स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहानुभूती दाखवत सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल केले आहेत ज्यामध्ये चौकात दुकानांसमोर पडलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या पुढ्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्या दुकानदारांनी दुकानासमोर कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे नागरिकांनी त्याची पोस्ट व्हायरल करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.