रमाई घरकुल योजने अंतर्गत काटगावला सर्वाधिक स्थान; ग्रामपंचायत चे कौतूक
सरपंच सौ.नगीनाताई सोमनाथ कांबळे यांचे कार्य कौतुकास्पद ; स्वातंत्र्या नंतर सर्वाधिक म्हणजे सन.२०१९ - २० मध्ये एकाचवेळी ७० लाभार्थी ना घरकुल योजनेचा झाला लाभ.
तुळजापूरःदि.२९
अनादी काळापासून गावकुसाबाहेर राहाणारा उपेक्षीत,वंचित,मागासवर्गीय समाजास त्यांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजना कार्यन्वीत केली.ह्याचा लाभ देण्यासाठी पुर्वी इंदिरा गांधी आवास योजनेत दारिद्र्य रेषेची अट होती.सदरील अट रमाई योजनेत शिथील झालेली आहे. त्यामुळे सर्व मागासवर्गीय बेघर कुटूंबास लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सामाजिक कर्तव्य व गावच्या सरपंच ह्या नात्याने काटगावच्या सरपंच सौ.नगीनाताई सोमनाथ कांबळे यांच्या सकारात्मक प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात पात्र असलेले ७० अर्जास मंजूरी मिळाली आहे. उपसरपंच अशोक माळी,
ग्रामसेवक भीमराव झाडे,रोजगार सेवक इरफान शेख,ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत मुळे यानीं परीश्रम घेतले आहे.
मंजूर घरकुला पैकी ४० लाभार्थींना पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा झाला असून उर्वरीत लाभार्थीनां एक दोन दिवसात पहिला हप्ता मिळणार आहे. अनेक घरकुलाचे बांधकाम पुर्णत्वाडे तर काही प्रगतीपथावर आहेत.सदरील मंजूर असलेले लाभधारक हे सन.२०१७ - १८ मधील प्रतिक्षा यादीमधील असल्याचे सरपंच सौ.नगीनाताई कांबळे यानीं ही माहिती दिली.
रमाई आवास योजने अंतर्गत सन.२०१९ - २० मध्ये एकूण ७० प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ४० लाभार्थीनां पहिल्या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली असून पंचायत समिती कार्यालयाकडून मिळालेल्या उद्दिष्ट प्रमाणे अजून १७ लाभार्थीचे प्रस्ताव कागदपत्र अभावी सादर करणे बाकी आहे.उर्वरित प्रस्ताव पं.स.आणि ग्रा.पं.कडून हे काम अभियान स्तरावर सर्वोच्च प्राधान्य देऊन पुर्ण करण्यात येत आहे. ग्रामसेवक भीमराव झाडे,ग्रामपंचायत काटगाव,
ता.तुळजापूर.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे , तुळजापूर