वर्षा कांबळे यांना जनाई -मुक्ताई समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

0
वर्षा कांबळे यांना जनाई -मुक्ताई समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

उस्मानाबाद/ प्रतिनिधी :-
      गौर येथील वर्षा कांबळे यांना रविवार दि .27 मार्च रोजी पुणे येथे 2022 चा जनाई -मुक्ताई समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
        याविषयीचे सविस्तर वृत्त असे की गौर तालुका कळंब येथील वर्षा विजय कांबळे या पेंटर असून  त्या स्वतःटेक्चर,रंगकाम डिझाइनिंग चे काम करतात.ग्रामीण भागात स्त्रिया चूल आणि मूल असे बहुतांश समीकरण असतानाही त्या पुरुषा मंडळीच्या क्षेत्रात पोटापाण्यासाठी शिरकाव करून कलर कामातील सर्व ज्ञान अवगत करून नेटाने संसार चालवतात.कलर कामात त्या  परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्याकडे  उस्मानाबाद जिल्ह्यांसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून कामाच्या ऑर्डर येत असतात.त्यांच्या या कामाची दखल पुणे येथील वृंदावन फाउंडेशन व विवेक फाउंडेशन यांनी 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी पुरस्काराचे आयोजन करते .          
       त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जनाई -मुक्ताई समाज भूषण पुरस्कार 2022  रविवार दि . 27 मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पुणे येथे सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते निलेशजी गद्रे,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या हस्ते कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
    तसेच यावेळीअनुपमा पवार ,ज्योती साठे , तेजस्विनी कुलकर्णी  ,प्रा.अलका सपकाळ , संस्कृती गोडसे ,  डॉ भाग्यश्री हुडेकर ,श्रद्धा जगताप ,डॉ अश्विनी काळे ,श्रद्धा थोरात याही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करून. पुरस्कार देण्यात आले .
   यावेळी कार्यक्रमाचे आयोजन वृंदावन फाउंडेशनचे सचिन पाटील प्रा. देविदास बिनवडे ,भीमराव यादव  जनाई मुक्ताई मंच पुणे महानगर यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top