ऊसचे पहिले बील न देणार्या कारखान्याचे साखर विक्री परवाने रद्द करा - दुधगावकर यांची कृषी मंत्री सत्तार यांच्याकडे मागणी
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दुधगावकर यांची कृषी मंत्री सत्तार यांच्याकडे मागणी
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे पहिले ऊस बिल (एफआरपीप्रमाणे) त्वरीत देण्यात यावे, ज्या कारखान्यांनी पहिली उचल दिलेली नाही. अशा कारखान्याचे तात्काळ साखर विक्री परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे लातूर येथे रविवारी (दि.21) भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांनी अतिरिक्त झालेला ऊस उस्मानाबाद जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे जानेवारी ते मे 2021-22 महिन्यापर्यंत पाठविला होता. ऊस पाठवून चार महिने झाले . मात्र अद्यापही पहिली ऊसाची उचल (एफआरपीप्रमाणे) काही कारखान्यांनी दिली नाही. अशा साखर कारखान्याचे साखर परवाने रद्द करुन त्यांचे साखर गोडवून ताब्यात घेवून त्याचा शासन स्तरावर लिलाव करावा. व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शेतकर्यांचे ऊस बील त्वरीत वाटप करण्यातसंदर्भात पुणे साखर आयुक्त यांना सूचित करण्यात यावे, अशी मागणी दुधगावर यांनी निवेदनात केली आहे.
तसेच मागील तीन महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. शेतकर्यांनी नगदी पिक म्हणून सोयाबीन पिकाची पेरणी केली. पिक उगवून आल्यानंतर सोयाबीनवर गोगलगायीचे संकटामुळे सोयाबीनचे अनेक फड उध्दवस्त झाले. त्यातच कमी की काय म्हणून सोयाबीन फुलोर्यात असताना एलो मोझॉक नावाचा रोग पडला. त्यामुळे अशा रोगाचे सोयाबीनची झाडे शेताबाहेर काढण्याचे काम करावे लागले. त्यातच सततच्या मोठ्या पावसामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. परिणामी सोयाबीन हातचे गेल्याची भिती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील शेतकर्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत विनाअट करुन शेतकर्यांसमारचे हे आर्थिक संकट दूर करावे. अशी मागणी केली. याप्रसंगी माजी मंत्री संजय बनसोडे, आ.ज्ञानराज चौगुले, उस्मानाबाद येथील शेतकरी उपस्थित होते.