बिहार प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील मागास्वर्गीयांची स्वतंत्र जणगणना करा , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

बिहार प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील मागास्वर्गीयांची स्वतंत्र जणगणना करा 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी


 उस्मानाबाद :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे नुकतीच बिहार राज्यामध्ये स्वतंत्र जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. तामिळनाडू, छतीसगढ़ आणी अनेक सुध्दा ओ.बी.सी. जनगणना केल्या असुन त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्या बाबतचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची गेल्या अनेक वर्षापासुनची मागणी प्रलंबीत आहे. जनगणना हा विषय केंद्रशासनाशी संबंधीत आहे. मात्र इतर मागास्वर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे महाराष्ट्रात ओ.बी.सी स्वतंत्र जनगणना करावी, देशातील अनुसुचित जाती व जमातीची जातवार जनगणना करून 150 वर्षे होत आलेली आहेत. स्वातंत्र्या नंतर भारत सरकाने अनुसूचित जाती व जमाती यांची जात निहाय व इतर सर्वांची एकत्रीत गणना करण्याचे धोरण स्वीकारले आहे यातुन मागास्वर्गीय ओ.बी.सी. वंचीत राहीले सन 1994 साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागास्वर्गीय आयोगाने ओ.बी.सी. 'जणगणना कशी आवश्यक आहे. हे सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले आहे. सन 2010 च्या 5 से ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सह 100 खासदारांनी ओ.बी.सी जनगणनेचा ठराव केला त्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः मा.शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय प्रयत्न केले होते त्यातुन 2011 ते 2014 मध्ये केंद्राने सामाजिक व अर्थिक जनगणना (SECC 2011) केली. मात्र त्याचे आकडेवारी राज्यांना दिली नाही.

देशात सन 2021 सालच्या नियमीत जनगणनेचे काम अदयाप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय जनगणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी आहे. निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर आबासाहेब खोत , राजाभाऊ माळी ,  बाळासाहेब कसबे , अहमद शेख , डॉ. काझी  , व्यंकटेश जाधव , बंटी खोत , सौरभ काळे , अमित जाधव , सुमित शिरसागर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top