भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला आणदुर मध्ये मोठा प्रतिसाद
तुळजापूर:- भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आ. जीवन रेड्डी , शकंर अण्णा धोडंगे , मा. खासदार हरी भाऊ राठोड , मा. मा. हिमानुशी तिवारी, मा.माणिकराव कदम , मराठवाडा प्रमुख सोमनाथ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील आणदुर येथे प्रत्यक्ष शेतकरी, नागरिक, युवकांची भेट घेऊन "भारत राष्ट्र समिती" पक्षाचे ध्येय, धोरण, काम यांची सुनील चव्हाण व ,अरविंद घोडके, सुरज बचाटे व टीमने माहिती दिली व पक्षाची सदस्य नोंदणी केली.
यावेळी गावातील प्रमुख चौकात पक्षाचे झेंडे, बनर लावून "भारत राष्ट्र समितीचे" मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्यात आली पक्ष नोंदणीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रतिसाद मिळत आहे.