धाराशिवमध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळसहा व चार वर्षांच्या मुलास हिसकावून घेऊन घराबाहेर हाकललेगरोदरपणातील वैद्यकीय सेवा देखील नाकारली

0

धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) -  मुस्लिम समाजातील एका विवाहित महिलेस हुंड्यापोटी माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला जात आहे. त्यासाठी पती, सासू , दीर, नणंद व जाऊ हे गेल्या ५ वर्षांपासून तिला तुला सोडून देऊन तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करीन, तिला टाकून बोलले, मारझोड, गरोदरपणात वैद्यकीय सेवा नाकारली.  सातत्याने शारीरिक व मानसिक अतोनात छळ करीत आहेत. विशेष म्हणजे तिला ६ व ४ वर्षांच्या मुलांना हिसकावून घेऊन घराबाहेर हाकलून दिले आहे. त्यामुळे वैतागून गेलेल्या विवाहितेने पोलिसाकडे धाव घेतली आहे.  दरम्यान आनंद नगर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक केलेली नाही. पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता त्या अबला महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी आर्त मागणी पीडित, हतबल व विवश विविहीतेने केली आहे.

धाराशिव शहरातील समता कॉलनीतील भाग्यनगर ह.मु. हॉटेल किंगच्या पाठीमागे येथे राहणाऱ्या फरिया यांचे अजीम शेख यांच्या बरोबर मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे २०१७ साली लग्न झाले.  मात्र २०१९ पासून सासू रुक्साना तबसम, दीर मो. अर्शद, जाऊ आस्मा समरिन उर्फ सना तसेच नणंद फरहीन मुजाहिद काझी हे विवाहिता फरिया शेख यांना तुझ्या वडिलाकडून २० लाख रुपये घेऊन ये असे म्हणत गेल्या ५ वर्षांपासून मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून घरी या अजीम शेख या पीडित विवाहितेने आनंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फरिया शेख यांचे २०१७ मध्ये मुस्लिम रीतिरिवाजानुसार लग्न झाले. लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांनी मोठा खर्च करून सोन्याचे दागिने, घरगुती वस्तू आणि रोख रक्कम देऊन लग्न करून दिले होते. तरी देखील तिच्या सासरच्यांनी तिला ‘तुझ्यामुळे सासरे वारले’ असे सांगून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. नंतर वारंवार सासरच्यां मंडळींनी "वडिलांकडून २० लाख रुपये आण" अशा मागणीचा तगादा लावला.  त्यासाठी तिला मारहाण केली गेली, तिच्या गरोदरपणात त्रास दिला गेला, वैद्यकीय सेवा नाकारण्यात आली. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला माहेरी आणले. मात्र २०२३ मध्ये तिच्या पतीने वेगळे राहू असे आश्वासन देऊन नांदावयास भाड्याच्या घराचा पत्ता देऊन तेथे येण्यास सांगितले. मात्र त्या ठिकाणी तो आला नसल्यामुळे तिची निराशा होऊन ती माहेरी निघून गेली. डिसेंबर २०२३ मध्ये ती मुलांना भेटण्यासाठी सासरी गेल्यावर सासरच्यांनी मारहाण करत घराबाहेर काढले. त्यामुळे वैतागून गेलेल्या व हतबल झालेल्या तरी या अजीम शेख या विवाहितेने पोलिसांमध्ये तिच्या पतीसह सासू  दीर, नणंद आणि जाऊ यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्या आधारे आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये पती अजीम शेख, सासू रुकसाना तबसूम, दीर मो. अरशद, जाऊ आस्मा समरिन उर्फ सना आणि ननंद फरहिन मुजाहिद काझी  यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ (८५),  २०२३ - ११५ (२), ३०२३ -  ३५२, २०२३ - ३५१ (२), २०२३ - ३५१ (३), २०२३ - ३ (५) आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही त्यांना अटक केलेली नाही.

...........


 राजकीय दबावाला बळी न पडता महिलांचा आवाज बुलंद करावा

या घटनेने पुन्हा एकदा समाजातील हुंडाबळी आणि स्त्रीविरोधी अत्याचाराचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. कारण सासरच्या मंडळीस राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधिता विरोधात कारवाई करू नये असा दबाव काही राजकीय मंडळीकडून पोलिसांवर वाढत आहे. त्यामुळे राजकीय दबावाला बळी न पडता पीडीतेला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. करण पोलीस जर पीडीतेच्या बाजूने उभे राहून न्याय मिळवून देऊ शकले तर इतर महिलांवर होणारा अत्याचाराला देखील आपोआप चाप बसू शकेल.

.....
मुस्लिम समाजातील विवाहित महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे बदल केलेले आहेत. मात्र तरी देखील मुस्लिम समाजातील काही पुरुष मंडळींचा आपल्या पत्नीवर हुंड्यासह इतर शुल्लक कारणावरुन अत्याचार करण्याचा दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. विशेष म्हणजे असे प्रकार रोखले तरच महिलांना सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि मूलभूत हक्क मिळण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top