उमरगा तालुक्यातील बेळंब येथील प्रगतशील शेतकरी मल्लिनाथ कारभारी यांचे गुरुवारी (ता.२२) रोजी रात्री दोन वाजता अल्पशा: आजाराने दुःखद निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच परिसरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मितभाषी, सुस्वभावी, मनमिळावू तसेच सामाजिक कार्यात सहभाग असल्यामुळे सर्वदूर परिचित होते. त्यांच्यावरती त्यांच्या शेतात दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार राजेंद्र कारभारी यांचे ते वडील होत.