प्रवाशांची लूट होत असल्याचे उस्मानाबाद न्यूज प्रकाशित केलेले वृत्ताची दखल..
ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची लूट उस्मानाबाद ते पुणे 700 - 800 रूपये तिकीट दर
खाजगी प्रवासी वाहन धारकांकडुन होत असलेल्या आर्थिक लुटी बाबत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
उस्मानाबाद :- दिवाळी सारख्या मोठया सणाच्या निमीत्ताने जनता उस्मानाबाद येथे आलेली असतानां परत मुंबई-पुणे-औरंबागाद सारख्या ठिकाणी जाण्यासाठी मागील काही दिवसापासुन महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात एस-टी कर्मचारी संपावर असल्यामुळे एस-टी वाहतुक बंद आहे. त्यामुळे या गोष्टीचा प्रसंगाचा गैरफायदा घेऊन खाजगी प्रवासी वाहतुकदाराकडुन सर्वसामान्य प्रवासी नागरिकांची प्रचंड प्रकारची लुट होत आहे.
मागील काही दिवसापासुन आमच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पुणे येथे जाण्यासाठी ५००/- रुपये लागत होते, परंतू सध्या १०००/- ते १२००/- रुपये प्रवासी भाडेच्या स्वरुपात आकारले जातात. काही गाडयांचे प्रवासभाडे ६००/- रुपये इतके आकारले जात होते मात्र गाडी मध्ये जागा असतांना देखील, समोरच्याची अडचण जशी आहे तसे दर आकारले जातात. आम्ही या सर्व प्रकाराचा जाहीर निषेध करतो. प्रवासी वाहतुक सुरळीत करण्यासाठी शासनाने परिवहन खात्याच्या काही अधिकाऱ्यांची नेमणुक केली होती. ते परिवहन अधिकारीही या सर्व प्रकरणामध्ये सहभागी आहेत असे वाटत आहे. परंतू दरवाढीबाबत कुठेही, कोणावरही कसल्याच प्रकारची चौकशी अथवा कार्यवाही ही नाही. तरी आपण तातडीने कार्यवाही करावी. तसेच परिवहन अधिकाऱ्यांवर सुध्दा कारवाई करावी, तसेच खाजगी प्रवासी वाहतुकदारांनी मागील पंधरा दिवसात जिकाही अवास्तव भाडेवाढ आकारलेले आहे ते भाडे कमी करुन आकारलेली भाडेवाढ प्रवाशांना परत करावी.
तरी वरील सर्व प्रकरणावर लक्ष देऊन अवास्त्व भाडेवाढ आकारणारे संबंधीत खाजगी प्रवासी वाहनधारक व शासनाने नेमणुक केलेले परिवहन अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा कडक इशारा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष अर्चनाताई अंबुरे यांनी महिला मोर्चाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. त्यावेळी भाजपा युवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड, मराठवाडा युवती प्रदेश संघटक पुजा देडे, अनुराधा जाधव, माधुरी डावखरे इत्यादी महिला उपस्थित होत्या.