सर्वसामान्य जनतेला हक्काचे व्यासपीठ व सहकार्य करणारे चॅनल म्हणून रेडीओ तेरणा महत्वपूर्ण भुमीका बजावेल - आ.राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद :- ‘आपली माणसं..... आपला आवाज...!!!’ ही टॅग लाईन घेऊन सुरु करण्यात येत असलेला रेडीओ तेरणा एफ एम चॅनल युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा हेतू असून सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडण्यासाठी व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात रेडिओ तेरणा महत्वपूर्ण भुमिका बजावेल असे प्रतिपादन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी स्व. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरु करण्यात येत असलेल्या सामुहीक रेडीओ केंद्र ९०.४ एफ.एम.च्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.
आई साहेबांनी आरोग्य क्षेत्रा मध्ये जे मोठे काम केले आहे. त्यांच्या प्रेरणेने आम जनते पर्यंत आरोग्य सुविधा कशा पुरवायच्या यासाठी सेवाभावी संस्था, सीएसआर या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. आजच्या या पवित्र दिनी डॉ. साहेबांच्या आशीर्वादाने एक मोठा उपक्रम आपण सुरु करत असून युवक युवतींना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी तसेच अडी अडचणीतील व्यक्तींना कसा न्याय देता येईल यासाठी काम केले जाणार आहे. आपण करत असलेल्या कामामध्ये जे यश मिळत त्यामध्ये तेरणा परिवाराचा सिंहाचा वाटा असल्याचही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना श्री. नितीन काळे म्हणाले कि, डॉक्टर साहेब म्हणजे हिरे शोधून पैलू पाडणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांना जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये भरीव वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात तेरणा परिवाराने अप्रतिम काम केले असून जिल्ह्यातील सामान्य व्यक्तीचा आवाज बुलंद करत आकांक्षित जिल्ह्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तेरणा रेडीओ निश्चितच मोलाचे योगदान देईल अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी रेवणसिध्द लामतुरे यांनी ऐतिहासीक संदर्भ देत, आकाशवाणी ही संकल्पना पुर्वापार चालत आलेली असून वासुदेव-देवकीला जेव्हा आठवा पुत्र झाला होता, तेव्हा झालेल्या आकाशवाणीचा संदर्भ देत समाजाच्या जडणघडणी मध्ये आकाशवाणीचे महत्व अधोरेखित केले. विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी या सर्वांच्या उत्कार्षामध्ये रेडीओ तेरणा मोलाचे योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना आकाशवाणी उस्मानाबाद केंद्राचे प्रमुख श्री. उन्मेश वाळिंबे यांनी श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी मनापासून बोलावे लागते आणि हेच आकाशवाणीच्या यशाचे गमक असल्याचा मूलमंत्र दिला. यावेळी एम.डी. देशमुख सर म्हणाले कि, जिल्ह्याचा आवाज बुलंद करणाऱ्या डॉ. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोज्वळ, सात्विक माउलींच्या जयंती दिनी तेरणा परिवाराने सुरु केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
जि प अध्यक्षा आमिताताई कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचिवण्यासाठी, तसेच विविध योजना आणि लाभार्थींच्या यशोगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी रेडिओ तेरणा चे सहकार्य घेतले जाणार असल्याचे म्हणून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री. दत्ता कुलकर्णी यांनी स्व. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्याच्या इतिहासात अभिनव उपक्रम राबवीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आपल्या माणसांचा आवाज आपल्याला या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. मनातून बोलणारा व माणस जपणाऱ्या परिवाराने हा उपक्रम सुरु केला असल्याने आणि श्री. वाळींबे म्हणाले त्याप्रमाणे रेडीओ तेरणा श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला.
आदरणीय डॉ. साहेब व आ. राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रोत्यांच्या पसंतीला उतरविण्यासाठी अपार कष्ट घेवून अल्पावधीतच रेडिओ केंद्र नावारुपाला आणू तसेच साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, कला, शेती शिक्षण, महिला सक्षमीकरण करणारे उपक्रम, शासनाच्या विविध योजना आणि संकल्पना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवणयासाठी रेडिओ तेरणा प्रयत्न करणार आहे. रेडिओ तेरणा चे अँड्रॉइड आणि आयओएस ॲप ही उपलब्ध झालं असून जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या उस्मानाबाद वासियांना आपल्या मातीशी जुडता येईल अशी माहिती स्टेशन हेड संजॉय मैंदंर्गी यांनी प्रास्ताविक पर भाषणात दिली.
तेरणा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी यावेळी तेरणा ट्रस्ट मार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहितीदिली.
उदघाटन प्रसंगी व्यासपिठावर माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील, तेरणा ट्रस्टचे विश्वस्त पृथ्वीजीतसिंह पाटील, बाळासाहेब वाघ, अशोकराव शिंदे, विजेंद्र चव्हाण, डॉ.अभय शहापूरकर, जि.प. अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे, संतोष बोबडे, शिवदास कांबळे, डी.के.पाटील, ॲड.खंडेराव चौरे, राजसिंहा राजेनिंबाळकर, सतीश दंडनाईक, विजय दंडनाईक,माऊली राजगुरू,आनंद कंदले, राजेंद्र अत्रे, सुनील काकडे, पंडितराव टेकाळे,अर्चना अंबुरे, ओम नाईकवाडी, रामदास अण्णा कोळगे प्रदीप शिंदे, डॉ. डी के पाटील, डॉ. जिंतुरकर यांच्यासह बहुसंख्येने प्रतिष्ठीत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. आकांक्षा ताकभाते तर आभार सुनिता गुंगाळ यांनी मानले.