Osmanabad news :-
आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ..
तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने पशुधन जीवितहानीसह घरांची पडझड व फळ बागांचे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी व महावितरणच्या अधिकाऱ्यांसह मौजे टेलरनगर, दिंडेगाव, येवती, देवसिंगा (तुळ), सलगरा (दि) गंधोरा, किलज आदी गावांना भेटी देवून आ. राणाजगजितसिह पाटील साहेब यांनी नुकसानीची पाहणी केली.
पाहणी दरम्यान किलज शिवारातील २० ते २५ विद्युत खांब व डीपी कोसळले आहेत. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. वीज कोसळल्याने गायी, म्हशी, शेळ्या दगावल्या आहेत. टेलरनगर येथे मोठे वडाचे झाड पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले असून झाडाखाली दबून काही शेळ्या दगावल्या आहेत.
नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचनामे सुरू असल्याचे भेटीवेळी ग्रामस्थांनी सांगितले व उर्वरित पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी तहसिलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, महावितरणचे कार्यकारी अभियंता गुजर, तालुका कृषी अधिकारी जाधव, वसंतराव वडगावे, अरविंद पाटील, विजय शिंगाडे, प्रशांत लोमटे, प्रवीण पाटील, खंडू शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, संबंधित गावाचे लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.