२६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

0

 २६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी  शस्त्रबंदी आदेश लागू

उस्मानाबाद,दि.21(जिमाका):-जिल्हयात सण,उत्सव  कार्यक्रम  विविध पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे,मोर्चे,बंद,संप इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेतदि. 26 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर2022 या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होणार आहेतसेच  या कालावधीत श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहेनमुद कालावधीत मोठया संख्येने भाविक देवी दर्शना करीता श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येतातदि.5 ऑक्टोबर  रोजी विजयादशमी (दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे


दि ऑक्टोबर रोजी कोजागीरी पोर्णिमा आणि ईद -ए मिलाद हे सण,उत्सव साजरे होणार आहेजिल्हयात ग्रामीणशहरी भागात विविध ठिकाणी यात्रा,जत्रा,ऊरूस लहान मोठया स्वरूपात साजरे होणार आहेततसेच मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच विविध पक्षसंघटना  शेतकरी यांचे वतीने त्यांचे विविध मागण्यासाठी धरणे,मोर्चे,उपोषण,आत्मदहन,निर्देशने  रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी या सर्व संपन्न होणा-या धार्मिक सण/उत्सव  आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्हयात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि.26 सप्टेंबर 2022 रोजीचे 00.01 पासुन ते दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुनमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे संपुर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांनी जमावबंदी  शस्त्रबंदी आदेश जारी केले आहे.


          या आदेशनुसार शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस कायदा  सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातुन 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पुढील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहेशस्त्र,सोटे,काठी,तलवार,बंदूक जवळ बाळगणार नाहीत.लाठया,काठया,शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील,सहज हाताळता येतील,अशा वस्तु बाळगणार नाहीत.कोणतेही दाहक पदार्थ,किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.आवेशी भाषणे,अंगविक्षेपण,विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता,नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे,निशाणी,घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.जाहिरपणे घोषणा करणे,गाणी म्हणने,वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान  सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण  असभ्य वर्तन करणार नाहीत.व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक/मोर्चा काढता येणार नाही.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top