उस्मानाबाद शहरात 13 जुलैपासून सात दिवस संचारबंदी; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय
उस्मानाबाद शहरात 13 जुलैपासून सात दिवस संचारबंदी; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जारी केला आदेश
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 जुलै ते 19 जुलै या कालावधीत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. गुरूवारी (दि.9) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
संचारबंदी कालावधीत उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापनांना वगळण्यात आले आहे.
संचारबंदी काळात हे सुरू राहणार
1) सर्व किराणा दुकान चालु राहतील.
2) सर्व दवाखाने, मेडीकल, चष्मा दुकाने, पशुवैद्यकीय सेवा चालु राहतील.
3) अंडी, मटन, चिकन, दुध व दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळ विक्री करणारे व संबंधित वाहतुक करणारे व इतर अत्यावश्यक सुविधा चालु राहतील.
4) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांनी भाजीपाला विक्रेत्यांना गलोगल्ली फिरुन भाजी विक्री करण्यास सूचित करावयाचे आहे. तसेच एका भाजी विक्रेत्यास एक गल्ली देण्यात यावी. सदर विक्रेता दुसर्या गल्लीमधे येणार नाही याची दक्षता घ्यावी.
5) सर्व बांधकामे सुरु राहतील. बांधकामावर सर्व मजुरांनी मास्क अथवा स्वच्छ रुमालाचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे.
6) जार, वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारव्दारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामधे पाणी यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे. किंवा जार, वॉटर स्पलायर्स यांनी संपर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार, वॉटर सप्लायर्स कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्राआधारे परवागनी राहील.
7) घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे.
8) फिरते दुध विक्रेते यांच्या मार्फत घरपोच दुध अथवा दुध पाकीटांची विक्री, वितरण करता येईल परंतु एका ठिकाणी उभे राहुन दुध विक्री करता येणार नाही. घरपोच दुध वा दुध पाकिटे वाटपाच्यावेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 पर्यंत राहील. 9) सर्व बँकेचे कामकाज व मिनी एटीएम सुरु राहील.
10) सर्व प्रकारची मालवाहतुक व त्यानुषंगाने उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात गोदामे चालविण्यास परवानगी देण्यात येत आहे, त्यानुषंगाने त्या आस्थापनांनी हमालांना ओळखपत्र उपलब्ध करुन द्यावीत.
11)वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालु राहतील.
12)सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील.
13) जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद येथील न्यायालयीन कामकाजास परवानगी राहील.
14) कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहील. सदर ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे.
15) उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रातील नागरीकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापी अत्यावश्यक सेवा, वैदयकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी ुुुwww.covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. 10) उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरीकांनी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने (ताप,सर्दी,खोकला, किदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.
17) विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणार्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील.
18)अंत्यविधीसाठी शासनाचे आदेशात नमुद केल्यानुसार नियमाप्रमाणे परवानगी राहील.
19) पेट्रोल-डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणार्या कर्मचार्यांचा वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल-डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल-डिझेल पंपावर काम करणार्या कर्मचार्यांना पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील. पेट्रोल-डिझेल पंप सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत चालू राहतील. तथापि पोलीस वेलफेअर पेट्रोल-डिझेल पंप दररोज 24 तास चालू राहील.
औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधे काम करणार्या कर्मचा-यांना । व्यक्तींना ओळखपत्र देण्याची जबाबदारी त्या त्या आस्थापनेची राहील तसेच त्यांची वाहतुक ठरलेल्या ठिकाणी करण्याची सोय संबंधित कंपनीने करावी. 21) प्रशासनाच्या पुर्व परवानगी शिवाय कोणत्याही धार्मिक यात्रा, मेळावे, विविध प्रकारची प्रदर्शने, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदरील आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशात म्हटले आहे.