मंदिर उघडण्यासाठी मागणी करून भाजपाला राज्यातील जनतेच्या जीवाशी खेळायचं --- खा. संजय राऊत
महाराष्ट्र - ( #osmanabadnews ) महाराष्ट्रातील कोवीड-19 धोका कायम आहे पंतप्रधान यांनी दोन दिवस अगोदर सांगून सुद्धा राज्यपाल महोदय व भाजपाचे नेते आंदोलन करणार असतील तर महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळत आहेत असे मी सांगेन असे मत खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले व ते पुढे बोलताना म्हणाले मंदिर उघडायची असतील तर पंतप्रधान यांनी सांगावे व आज रात्री बारा वाजल्यापासून हा राष्ट्रीय आदेश आहे असे लागू करावे व सगळीकडे मंदिरे उघडतील व आम्ही आदेशाचे पालन करु , गुजरात व गोवा राज्यात देखील मंदिरे उघडली नाहीत केरळ राज्यात किती मंदिरे उघली आहेत पहा सवाल त्यांनी उपस्थित केला ..
अकारण वाद निर्माण केला हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण देशाचा आहे चर्च , गुरुद्वार , मज्जिद , मंदिरे , प्रार्थना स्थळे ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात महाराष्ट्र राज्यच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खडबडीत पत्र पाठवलं मग तितकाच खडबडीत उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ते ठाकरे आहेत विसरू नका असा सूचक इशारा यावेळी खा. संजय राऊत दिला आहे .
महाराष्ट्रात अशा प्रकारे राजकारण करून सरकार महाराष्ट्राचे अस्थिर होणार आहे का ? अजिबात नाही सरकार मजबूत आहे व ती पाच वर्षे टिकेल व भारताच्या घटनेनुसार चालेल संविधान , घटना ही राज्यपालांनी ही पाळावे लागेल मुख्यमंत्री पाळत आहेत राष्ट्रपती , प्रधानमंत्री हेसुद्धा सेकुलर आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने हा देश चालवायला हवे असे मत खासदार संजय राऊत यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले आहे याचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर बीबीसी मराठी च्या पेज वर उपलब्ध आहे.