जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १२० शेतकरी कुटुंबास ३० लाखाच्या आर्थिक मदतीचे वितरण

0


Osmanabad news:- 

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १२० शेतकरी कुटुंबास ३० लाखाच्या आर्थिक मदतीचे वितरण


नाम फाऊंडेशनचे दातृत्व
प्रतिकूल स्थितीत मदतीचा महत्त्वपूर्ण आधार
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय गहिवरले!

उस्मानाबाद: नाम फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १२० शेतकरी कुटुंबास ३० लाख रुपयाची आर्थिक मदत उस्मानाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
शहरातील  साईिलला सभागृहात शुक्रवारी (दि.१२) मदत वाटपचा कार्यक्रम  घेण्यात आला. कार्यक्रमास  जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, उद्योजक दत्तात्रय पाटील, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचे नाम फाऊंडेशनचे समन्वयक डॉ. हर्षवर्धन राऊत, मुकुंद उंबरे, अमोल पाटील व अनंत लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात जिल्ह्यातील १२० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना प्रत्येकी २५ हजार रुपयाची आर्थिक मदत मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. ही संपूर्ण मदत धनादेशद्वारे देण्यात आली. या मदतीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियास गहिवरून आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास माहिती पोहचवण्यासाठी तालुका समूह संघटक,  प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील  गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.


शेतकरी शेतमजुरांसाठी नामची महत्त्वपूर्ण मदत - पत्रकार रणदिवे
 मराठवाडा, विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पशूपालक आदी वंचित घटकांना नाम फाउंडेशनची सदैव अतिशय महत्त्वपूर्ण मदत झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फऊंडेशनने जिल्ह्यात आतापर्यंत पाणलोट क्षेत्र वाढविण्यासाठीही मोठे काम केले आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शिलाई मशीन आदी साहित्य देऊन मोठा आधार देण्याची काम केले असल्याचे प्रतिपादन पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी सक्षम बनावे- डॉ. राऊत
आत्महत्या हा कधीच पर्याय होऊ शकत नाही. जी घटना होऊन गेली आहे ती निश्चितच कदापी भरून निघणार नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबानी स्वत: खंबीर होऊन आपल्या पुढच्या पिढीतील लेकरांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबावरच हे सावट  दूर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नाम फाऊंडेशनचे उस्मानाबाद व लातूर जिल्हा समन्वयक डॉ. राऊत यांनी केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top