गायरान व गावठाण जमिनी संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - आ. राणाजगजितसिंह पाटील

0

गायरान व गावठाण जमिनी संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपला पाठपुरावा राहील.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गायरान जमिनीवर दीर्घ काळापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याचा महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला.

या संदर्भात मा.उच्च न्यायालयात राज्य सरकार शपथपत्र दाखल करणार आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना अधिकृत जागा व हक्काचे घर मिळणार आहे. 

गावठाण क्षेत्रात निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नियमित करण्याबाबत दि.३१.१२.२०२२ पर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले असून याबाबतचे परिपत्रक ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. राजेश कुमार यांनी काढले असून ते सर्व जिल्हापरिषदेच्या मुख्याधिकारी यांना कळविले आहे. त्यात प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीचा कालावधी विहित करण्यात आला आहे.

गायरान व गावठाण मध्ये राहणाऱ्या नागरिकांचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे मनःपूर्वक आभार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top