महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थींनी त्वरित आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा

0

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थींनी त्वरित आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा

 

उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन निर्णय दि.29 जुलै 2022 अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमीतपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे.

जिल्ह्यातील 450 गावांतील 3 हजार 641 लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी दि.25 डिसेंबर 2022 रोजी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. याद्या गावांतील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय आणि बँक शाखेमध्ये प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र, सी.एस.सी.सेंटर किंवा बँक शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top