तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी केली.
उस्मानाबाद (प्रतिनिधी) उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी पावसामुळे अतोनात पिकांचे नुकसान झाले आहे. खासदार ओमराजे यांनी बाधावर जात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधला शेतकऱ्यांना धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरकट पंचनामे करण्याच्या सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केल्या. शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले.