उस्मानाबाद व लातूर जिल्हा प्रशासनाने वाचवले पुरात अडकलेल्या 16 नागरिकांचे प्राण ..

0

 

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने वाचवले पुरात अडकलेल्या 16 नागरिकांचे प्राण ..


उस्मानाबाद :- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अफाट नुकसान झाले आहे.

व अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने जिल्हा प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले व

उमरगा तालुक्यातील  बेडगा 6 , कदेर 2 , गुजोंटी 2 , व लोहारा तालुक्यातील राजेगाव येथील 6 अशा एकुण 16 नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने पुरात अडकलेल्या 16 नागरिकांचे प्राण वाचवले आहेत.


परंडा तालुक्यातील खंडेश्वर वाडी येथील 1000 नागरिकांना आगोदर सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते व आज कावळेवाडी येथील 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


ज्या ठिकाणी तलाव फुटुन नुकसान झाले आहे त्या ठिकाणचे तात्काळ पचंनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे. व जुन ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने दिलेल्या नियमानुसार एकत्रित 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावा असे आदेशात नमूद केले आहे.

विशेष

राजेगाव (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथे काही व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकल्याचा लातूर जिल्हाधिकारी यांना मिळाल्यानंतर लातूरहून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंञणेमार्फत दोन बोटी आणि 14 जणांची टीम पाठवण्यात आली. या बचाव पथकाने पुरात अडकलेल्यांना यशस्वीपणे बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. बचाव पथकात योगदान देणाऱ्या सर्वांचे लातुर जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top