काळेवाडी तलाव धोकादायक परिस्थितीत : प्रशासनाने दखल घेत उपाययोजना केल्या सुरू .....
उस्मानाबाद :- पा.त काळेवाडी तालुका परांडा हा तलाव काल पासून धोकादायक झाला आहे. तलावाच्या वरच्या बाजूस तलावाच्या लांबीस समांतर भेगा गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर लागलीच उपाय योजना सुरू केल्या आहेत. साधारण 200 मी. लांबीमध्ये भरावा खचत आहे.
सांडव्या मध्ये Pokland machine च्या साह्याने pilot cut घेऊन पाणी पातळी कमी करण्यात येत आहे. परंतु खडक असल्याने खोल चर जात नाही. त्यामुळे braker. लावून खोल चर घेण्यात येत आहे.
त्या व्यतिरिक्त पाईप टाकून पाणी कमी करण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.
तसेच JCB व tractor च्या साह्याने खचलेल्या ठिकाणी भरावा टाकण्यात येत आहे. तलावाची पाणी साठवण 200 सघमी आहे. सध्या 2 फूट पाणी पातळी कमी केलेली आहे. अजून 4 फूट पाणी पातळी कमी झाल्यास धोका कमी होईल. तसेच भरावाच्या खालच्या बाजूस वेगळे Pokland व 4 हायवा च्या साह्याने berm टाकण्याचे काम सुरू करत आहे. कार्यकारी अभियंता,
तहसीलदार, BDO उपअभियंता सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहे. या तलावातील पाणी जाण्याचा मार्ग पूर्ण झाल्यास तलाव फुटण्याचा धोका कमी होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणेकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अण्णासाहेब कदम यांनी दिली.
**********