रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रीय निविष्टा - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिलकुमार नवाळे

0





लोहारा / प्रतिनिधी



 उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लोहारा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान व राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत सन 2019-20 पासुन लोहारा तालुक्यात गटातील महिला शेतकरी यांच्यासाठी सेंद्रीय शेती अभियान चालु आहे त्या अंतर्गत आजपर्यंत तालुक्यात एकुण 27 गावामध्ये 20 सेंद्रीय गट स्थापन झाले असून सेंद्रिय शेती करत आहेत. सदर सेंद्रिय शेती करणाऱ्या अभियानातील बेंडकाळ येथील कृषी सखी, लक्ष्मि मोरे यांनी सुरु केलेल्या उमेद सेंद्रिय शेती सेवा केंद्रास जिल्हा परिषद उस्मानाबाद चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा अभियान संचालक, अनिलकुमार नवाळे यांनी भेट देऊन पाहणी केली सदर सेवा केंद्राच्या माध्यमातून रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रीय निविष्टा हा चांगला पर्याय असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा अभियान संचालक, अनिलकुमार नवाळे यांनी व्यक्त केले. सदर केंद्राच्या माध्यमातून कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रीय निविष्ठा दशपर्णी अर्क, जिवामृत, वेस्ट डी कंपोजर, अग्निअस्त्र, व्हर्मी वॉश, गांडुळ खत इ. सेंद्रीय निविष्ठांचे वापर कसे करावे याची माहिती देण्यात येणार आहे सेंद्रिय शेती मुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पनात वाढ झाली आहे  याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा अभियान संचालक, अनिलकुमार नवाळे यांनी समाधान व्यक्त केले तसेच तालुक्यात सेंद्रिय शेती साठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, लोहारा शी संपर्क साधनेचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा अभियान संचालक, अनिलकुमार नवाळे यांनी केले बेंडकाळ येथे सेंद्रिय शेती निविष्ठा सेवा केंद्र येथे भेट दिली या वेळी उपस्थित पंचायत समिती, लोहारा चे गट विकास अधिकारी, मा. सोपान अकेले, सहायक गट विकास अधिकारी, मा. संजय ढाकणे, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, कृषी सखी लक्ष्मि मोरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top