उस्मानाबाद :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व उस्मानाबाद यांच्या वतीने सोमवार दिनांक २१-०६-२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता शासकीय तंत्रनिकेत कॉलेज समोर औरंगाबाद- सोलापूर महामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन
ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन होणार आहे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष महादेव माळी, लक्ष्मण माने,सचिन चौधरी,शेहनवाज सय्यद,रॉबिन बगाडे आदी उपस्तिथ होते तरी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष महादेव माळी यांनी केले आहे