जिल्ह्याच्या पर्यटन संवर्धन आणि विकासाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व नागरिकांच्या साथीने अनेक उपक्रम राबवण्यात येणार - पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
जिल्ह्याच्या पर्यटन संवर्धन आणि विकासाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व नागरिकांच्या साथीने अनेक उपक्रम राबवण्यात येणार



 उस्मानाबाद :- जिल्ह्याच्या पर्यटन संवर्धन आणि विकासाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, उस्मानाबाद आणि उस्मानाबादमधील नागरिकांच्या साथीने अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणजे उस्मानाबाद शहरातील महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती सर्व नागरिकांना व्हावी या दृष्टीने माहिती फलकाचे काल स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून मा. पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार मा. ओम राजेनिंबाळकर, आमदार मा. कैलास पाटील, नगराध्यक्ष मा. मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.



 जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर असणारे पहिल्या महायुद्धाचे स्मारक, धाराशिव लेण्या, ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे. यांचा दर्गा व धारासुर मर्दिनी मंदिर येथे माहिती फलक बसवण्यात आले. माननीय जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शन व सहयोगाने या संकल्पनेला मूर्त रूप प्राप्त झाले. 





याप्रसंगी राज कुलकर्णी, दिव्य मराठी वृत्तपत्राचे ब्युरो चीफ चंद्रसेन देशमुख, समर्थ सिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे शेखर घोडके, धिरज मोटे, यशश्री क्लासेसचे मा. रवी निंबाळकर,  शरदचंद्र पवार फाऊंडेशनचे सदस्य सूरज मोटे, लेखक व इतिहास अभ्यासक केतन पुरी,रणवीर इंगळे, ज्ञानेश्वर राऊत, अमित साळुंके, अनिकेत पाटील, नुपूर नायगावकर, राहुल गवळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top