पेट्रोल डिझेलवरील राज्याचा टॅक्स कमी करण्याच्या मागणीसाठी भाजयुमो उस्मानाबादच्या वतीने जोरदार निदर्शने
भ्रष्टाचाराच्या प्रकरणापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी शिवसेना व आघाडी सरकारचे नौटंकी आंदोलन - राजसिंहा राजेनिंबाळकर
Osmanabad दि. 4 -
पेट्रोल डिझेलवरील राज्यसरकारने लावलेला टॅक्स कमी करून इंधनाच्या वाढलेल्या किमतीत दिलासा द्यावा या मागणीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष काळे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदारपणे निदर्शने करण्यात आली. ठाकरे सरकार मधील दररोज चव्हाट्यावर येणार्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी शिवसेना व आघाडी सरकारचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टिका यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी पेट्रोल वरील टॅक्स कमी न करणार्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो, डिझेलवरील टॅक्स कमी न करणार्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो, रोज नवा भ्रष्टाचार करणार्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो, या ठाकरे सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणांनी परीसर दुमदुमून टाकत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या "आंदोलनाला कच्चे चिवसैनिक-कच्चे बदाम खा-अन बुद्धी वाढवा"
आंदोलन असे नाव दिले होते. काही दिवसांपासून उस्मानाबाद शहरात शिवसेना,व आघाडी सरकारच्या वतीने इंधनदरवाढ संदर्भात आंदोलन करण्याचे नाटक केले जात होते.सामान्य जनतेच्या कोणत्याही प्रश्नांशी सोयरसुतक न ठेवता सत्तेचा वापर फक्त आणि फक्त स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी चालू असलेला दिसत आहे, असेही राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी म्हटले.
केंद्राच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारने डिझेलवरील 5 रुपये व पेट्रोलवरील 10 रुपये टॅक्स कमी केला होता, मात्र राज्यातील ठाकरे सरकारने 1 रुपयांचाही टॅक्स कमी केलेला नाही. असे असतानाही सत्ताधारी शिवसेनेचे व आघाडी सरकारचे पेज-3 नेतेमंडळी चमकोगिरी आंदोलक केवळ स्वतःच्या पक्षाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आंदोलनाची नौटंकी करत आहेत असे मत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात पांडुरंग लाटे, अभय इंगळे, पांडुरंग आण्णा पवार, अर्चना अंबुरे, इंद्रजित देवकते, पुजा देडे, दाजी अप्पा पवार, प्रविण पाठक, अमोल पेठे, सुजित साळुंके, वैभव हंचाटे, मोहन मुंडे, संदिप इंगळे, प्रवीण सिरसट, सुनिल पंगुडवाले, पृथ्वीराज दंडनाईक, दाजी अप्पा पवार, सचिन लोंढे, राहुल शिंदे, विद्या माने, देवकन्या गाडे, ओम नाईकवाडी, राज निकम, अमित कदम, हिम्मत भोसले, स्वप्नील नाईकवाडी, मेसा जानराव, ड. कुलदिपसिंह भोसले, प्रीतम मुंडे, ओमकार देशमुख, सुनिल पंगुंडवाले, जगदिश जोशी, प्रसाद मुंडे, सागर दंडनाईक, दादुस गुंड, सार्थक पाटील, अजय उंबरे, ज्ञानेश्वर पडवळ, ज्ञानेश्वर शिंदे, नरेन वाघमारे, ज्ञानेश्वर सुळ, युवराज घोडके, धनराज नवले, अक्षय भालेराव, रोहित देशमुख, अर्जुन पवार, गणेश इंगळगी, गीरीष पानसरे, अजय यादव, उदय देशमुख, शंकर मोरे, आकाश सलगर, मोनु पाटील व सर्व युवा मोर्चा, महिला मोर्चा, एस.सी.मोर्चा, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.