ईडीच्या विरोधात उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी परिवारावर झालेल्या कारवाईचा केला निषेध
उस्मानाबाद -
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी परिवारावर सरकार व सक्त वसुली संचालनालय (इडी) ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. कुलदीप उर्फ धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार सोनियाजी गांधी यांनी वेळोवेळी इडीला सहकार्य केलेले असताना वारंवार चौकशीला बोलावून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आला.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, सन 1938 साली स्वातंत्र्यपूर्व काळात स्व.पंडीत जवाहरलाल नेहरू, स्व.सरदार वल्लभभाई पटेल, स्व.पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव हे वृत्तपत्र सुरू केले.
नॅशनल हेरॉल्ड हे नांव ऐकताच इंग्रज राजवट हडबडुन जायची हे वृत्तपत्र गुलामगिरीच्या त्या काळात स्वातंत्र्य सैनिकांच्या सोबत होते.या वृत्तपत्रामुळे स्वातंत्र्य सैनिकांमध्ये जनजागृती व जोश भरायचा यामुळे भारतीयांसाठी स्वातंत्र्यचा आवाज सीमापारहून उठू लगला आणि इंग्रज राजवटीवर त्याचा दबावही तयार होत होता. त्यामुळे कित्येक वेळा इंग्रजानी याला टाळे ठोकण्याचे प्रयत्न केले होते. स्वातंत्र्यनंतर नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र तोटयात चालले होते.या संकटातून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस ने 2002 ते 2011 च्या दरम्यान 90 कोटीचे कर्ज दिले. परंतु नॅशनल हेरॉल्ड हे 90 कोटीचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरली म्हणून या असोसिएटेड जर्नल लिमीटेड च्या इक्विटी शेअर्स मध्ये ट्रान्सफर केले.परंतू इक्विटी शेअर्सचे स्वामित्व काँग्रेस स्वत:जवळ ठेवू शकत नव्हती. म्हणून काँग्रेसने सेक्शन 25 अंतर्गत यंग इंडियन ही कंपनी नॉट फॉर प्रॉफिट म्हणून जी कंपनी नफा कमविण्यासाठी स्थापित केलेली नाही अशा कंपनीकडे सोपविण्यात आले म्हणजे जर काँगेसकडे स्वामित्वच नव्हते तर राहूल गांधी किंवा सोनिया गांधी, मोतीलाल व्होरा हे घोटाळा कसे करू शकतात.
मा.खा.सब्रमण्यम स्वामी यांच्या 2015 मधील फक्त एका तक्रारीवरून (सक्त वसुली संचालनालय) ने मा.खा.सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, मोतीलाल व्होरा यांच्या विरूध्द कारवाई सुरू केली आणि ईडीला सुरुवातीलाच कळाले होते की,या प्रकरणा मध्ये कोणतीच केस बनत नाही. परिणामी हे प्रकरण बंद करण्यात आले होते आणि हे वर्ष होते 2015 म्हणजे केंद्रा मध्ये भाजपा सरकार होते.
आता 2022 मध्ये कोणतेही कारण नसताना केवळ बदनामी, सुड:बुध्दीने केंद्र सरकारच्या दबावामुळे इडी ह्या प्रकरणात गेली तीन दिवस खा.राहुलजी गांधी, खा. सोनियाजी गांधी चौकशीसाठी बोलावून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. खा.सोनिया गांधी यांनी ईडीला वेळोवळी सहकार्य केले आहे. परंतू या प्रकरणात काहीही नसताना नाहक दिवस दिवस चौकशीला बसवून त्रास दिला जात आहे. तरी या गोष्टीचा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जाहिर निषेध करीत आहोत.
येणाऱ्या काळात हे प्रकरण थांबविले नाही तर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस च्या वतीने रस्ता रोको आंदोलन, जेल भरो आंदोलन अशा प्रकारे तीव्र आंदोलने करण्यात येतील असा ईशारा यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी यावेळी दिला आहे
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, विधी विभाग प्रदेश उपाध्यक्ष अॅड. विश्वजित शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, मानवी हक्क विभाग जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, माजी प्रदेश उपाध्यक्षा डॉ.स्मिता शहापूरकर, शीला उंबरे, आविदाबाई चव्हाण, दर्शन कोळगे, अॅड.जावेद काझी, धनंजय राऊत, सिद्धार्थ बनसोडे, हनुमंत पवार, अहेमद चाऊस, सेवादल शहराध्यक्ष अतुल चव्हाण, युवक काँग्रेस विधानसभा सरचिटणीस स्वप्नील शिंगाडे, माजी क्रीडा अधिकारी बनसोडे, सौरभ गायकवाड, संतोष पेठे, आरिफ मुलाणी, ताश्कील सय्यद, शाकेर शेख, आज्जू शेख, प्रेमानंद सपकाळ, सलमान शेख, कपील सय्यद यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.