स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह येथे स्कूल बॅग वाटप
उस्मानाबाद : स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, आळणी येथील ११० मुलींना जि.प.च्या माजी उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांच्याहस्ते स्कूल बॅग वाटप करून त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.धनंजय धावारे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजातील निराधारांना आधार देणे आपले कर्तव्य आहे. श्री.धावारे करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी यावेळी बार्शी येथील सामजिक कार्यकर्ते धनंजय धावारे व त्यांचे सहकारी तसेच कळंब, तुळजापूर, मंगरूळ, येरमाळा, तेर, बार्शी येथून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.