गुजरात सरकारद्वारा बिल्कीस बानु सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणातील आरोपींची मुक्तता केल्याचा मुस्लिम समाजाकडून निषेध ; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
उस्मानाबाद :
गुजरात सरकारद्वारा बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची मुक्तता केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीना निवेदन दिले आहे.
उस्मानाबाद शहरातील नागरीक प्रतिनिधीक स्वरुपात एकत्र येऊन बिल्कीस बानु सामुहिक बलात्कार व तिच्या कुटूंबातील 7 जणांच्या निघृण हत्येच्या दोषी 11 जणांना मा. सीबीआय कोर्ट नंतर मा. मुंबई उच्च न्यायालयाने व नंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना अजन्म कारावास ही शिक्षा दिलेली होती. अशा शिक्षा भोगत असलेल्या दोषींना गुजरात सरकारने 15 ऑगस्ट या रोप्यमहोत्सवी स्वांतत्र दिनी त्यांची मुक्तता केली ही बाब मानवतेला काळीमा फासणारी व अत्यंत किळसवाणी घटना असून त्याचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत.
गोधरा कांड झाल्यानंतर गुजरातमध्ये ठिकठिकाणी दंगली उसळल्या होत्या तेंव्हा अहमदाबादच्या रंधीपुर गावात 3 मार्च 2002 रोजी बिल्कीसबानू व तिच्या कुटुंबियाना विशेष लक्ष करून ती व तिचे कुटूंब सुरक्षीत स्थळी घाबरून जात असताना त्यांचा पाठलाग करून या प्रकरणातील दोषी व इतर जणांनी जमाव तयार करून त्यांच्या कुटूंबियावर हल्ला केला विशेष म्हणजेच हे सर्व दोषी बिल्कीस बानू हिच्या शेजारी व परिसरातील लोक होते. बिल्कीस बानु काही महिन्याची गर्भवती असताना तिच्यावर सामुहिक बलात्कार केला व तिच्यासमोर या चिमुकल्या तीन वर्षाच्या मुलीला रस्त्यावर आपटुन ठार मारण्यात आले व कुटूंबातील इतर 7 जणांची हत्या करण्यात आली अनेक स्त्रीयांवर बलात्कार करण्यात आले अशी कुर घटना घडलेली असताना त्यांना जनतेतुन फाशीची मागणी होती परंतू विविध न्यायालयांनी त्यांची कुरता लक्षात घेता अजिवन कारावासाची शिक्षा दिलेली होती. असे असताना गुजरातमधील भाजपा सरकारने कलेचे तारे तोडुन स्वातंत्र्या दिनी त्यांची शिक्षा माफ करुन त्यांना त्याच दिवशी मुक्त केले आहे.
गुजरात सरकारीची ही घटना अतिशय निंदनीय असुन आपण यामध्ये गांभीर्याने दखल घेवुन सरकारचा हा निर्णय ताबडतोब रद्द करून दोषींना शिक्षा कायम ठेवावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची आपण गांभीर्याने दखल घेऊन बिल्कीस बानू हिस न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर मसूद शेख , खादर खाँ पठाण , समोदिन मशाक ,शेख आयाज , खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, वाजिद पठाण , इस्माईल शेख ,अनवर शेख ,बिलाल तांबोळी, एजाज काझी , शेख अतिक , मुस्तफा खान , मन्नान काझी , मेहमूद मुजावर, गयाज मुल्ला , बाबा मुजावर , अवेज मोमीन , अझर मुजावर ,तोहीद शेख, पीरजादे अफरोज, पठाण सैफ अली , शेख शाहरेक , समीर शेख , अन्वर शेख , सय्यद यासिर , इत्यादीच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.