google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 काँगेसचे जारकीवली यांच्या वक्तव्याचा भाजपने जोडे मारुन केला निषेध , काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्याची केली मागणी

काँगेसचे जारकीवली यांच्या वक्तव्याचा भाजपने जोडे मारुन केला निषेध , काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्याची केली मागणी

0



काँगेसचे जारकीवली यांच्या वक्तव्याचा भाजपने जोडे मारुन केला निषेध , काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्याची केली मागणी

उस्मानाबाद दि.११ (प्रतिनिधी) – कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदु धर्म हा पर्शीयन शब्द असुन त्याचा अर्थ अत्यंत घान आहे, तो शब्द आमच्यावर का थोपावला जातोय अशे बेताल व हिंदु धर्मांची घृणा करणारे अपशब्द वापरुन हिंदु धर्माचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.११ नोव्हेंबर रोजी जारकीवली यांच्या प्रत्येकात्मक पुतळयास जोडे मारीत दहन करुन निषेध केला.

सध्या काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो यात्रा काढत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचीच मंडळी देशातील मानसा मानसात व धर्मा धर्मात द्वेश पसरविणारे अत्यंत खालच्या पातडीचे वक्तव्य करुन दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच प्रत्यय कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांच्या सारख्या बेताल वक्तव्य व मनसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीकडुन घाणेरडी वक्तव्य केले जात आहेत. त्यामुळे खा.राहुल गांधी यांनी सतीश जारकीवली यांची तात्काळ पक्षातुन हकालपट्टी करण्यात यावी व यापुढे कोणत्याही नेत्याने असे अपशब्द वापरु नयेत असा इशारा देण्यात आला. यावेळी सतीश जारकीवली यांच्या प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारुन दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपजिल्हाध्यक्ष सुनील काकडेपांडुरंग लाटे, शहराध्यक्ष राहुल काकडे, अभय इंगळे, प्रविण सिरसाठे, दत्ता पेठेबापू पवार, दाजीप्पा पवार, शेषेराव उंबरे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, देवा नायकल, हिम्मत भोसले, गणेश मोरे, प्रितम मुंडेरोहीत देशमुखसुनील पंगूडवाले, अमित कदमजगदीश जोशी, सागर दंडनाईक आदीसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


सतीश जारकीवली यांनी हिंदु धर्म व हिंदु धर्मीयांची सळसळते रक्त भडकविणारे वक्तव्य केले. तसेच छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीचा व मराठयांचा अपमान करीत धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत असे बेताल व घृणास्पद वक्तव्य केले आहे. ते महाशय एवढयावरच थांबले नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांनी मुस्लीमांच्या मदतीने मोगला विरुध्द लढा देत मस्जिद उभारली अशी गरळ ओकत आपली औकात दाखवलेली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला तात्काळ पदमुक्त केलेच पाहिजे अशी मागणी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बोलताना केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top