मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला नाही , सुरेश पाटील यांनी ते शब्द मागे घेत केली दिलगिरी व्यक्त
उस्मानाबाद दि.१५ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप) गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला अशा पद्धतीची सोशल माध्यमांवर क्लिप फिरत आहे. परंतू छत्रपती शिवाजी महाराज हे माझे महाराष्ट्राचे व संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांचा अवमान केला नाही व करणार नाही. तसेच जर कोणाला अवमान केला असे वाटत असेल तर त्याबद्दल मी माझा शब्द माघारी घेतो व दिलगिरी व्यक्त करतो असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप) चे सुरेश पाटील यांनी दि.१५ जुलै रोजी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील चार दिवसा खाली शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी जाऊन नाटकी मुजरा घालीत महाराज आजपर्यंत जिल्ह्याचे विकास केला नाही. शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे व अतिवृष्टी गारपिटीचे पैसे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन देखील अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. तसेच दूध उत्पादकांच्या दुधाला भाव देखील दिला जात नसल्यामुळे त्यांच्यावर २०२४ ला तलवार चालवा असे नाटक केले होते. त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून कधी उतरतील ? त्यांनी केव्हा तलवार चालवावी ? असे उत्तर दिले होते. मात्र मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असा अपप्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे मी ते शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा पाटील यांनी केला आहे.