खरीप पिकांचे ताबड़तोब पंचनामे करा अन्यथा संबधित अधिकार्याचे श्राद्ध घालु- प्रहार शेतकरी संघटणेची मागणी..

0
उस्मानाबाद :- आज दि.28 सप्टेंबर रोजी प्रहार शेतकरी संघटना उस्मानाबाद च्यां वतीने मा जिल्हाधिकारी व जिल्हाउपधिक्षक कृषिधिकारी यांना सध्या चालु असलेल्या सोयाबीन पिक नुकसानी बाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात अतिवृष्टि मुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे जे काही नुकसान झाले आहे त्यामुळे सदरील पिक शेतकऱ्यांच्यां हातातुन गेले असून   यापरिस्थितीत शेतकार्याचे अतोनात नुकसान झाले आहे या कोरोना सदृश्य परिस्थितिमुळे शेतकरी अगोदरच भयानक अडचणीत सपडलेला आहे या परिस्थिती ची जाणीव ठेऊन प्रशासनाने लावकरातलवकर खरीप हँगामातील सर्व पिकांचे ताबड़तोब पंचनामे करून योग्य ते नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करुन देण्यात यावी अन्यथा ज्या गावात शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले नाही अश्या गावातील जबाबदार अधिकार्याचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेच्यां वतीने देण्यात आला आहे होणारा परिनामास प्रशाशन जबाबदार राहील असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी दादा देशमुख यांनी सांगितले आहे सदरील निवेदनावर प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे व इतर शेतकरी उपस्थित होते...
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top