उस्मानाबाद शहरातील नवीन हायवे क्र. 52 च्या सर्विस रोडचे काम सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0

उस्मानाबाद शहरातील नवीन  हायवे क्र. 52 च्या सर्विस रोडचे काम सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


उस्मानाबाद :-  उस्मानाबाद शहर हद्दीतुन जाणा - या नॅशनल हायवे जुना क्र .211 नवीन क्र . 52 लगत सर्विस रोड करून देणे बाबत पत्र क्र .1 . जा.क्र .390 / 18 दिनांक 29.01.2018 2. जा.क्र . 894/18 दिनांक 06.03.2018 या  संदर्भीय पत्रांद्वारे विनंती केली होती . परंतु अद्याप त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही . सदर ठिकाणी सर्विस रोड नसल्यामुळे तेथील नागरीक मोठया प्रमाणात त्रस्त झाले असून त्यांना रोज गैरसोई ला तोंड दयावे लागत आहे . व ब-याच नागरिकांनी तेथे आपला जिव गमवला आहे . तरी देखील तेथे सर्विस रोड चे काम हाती घेण्यात आलेले नाही . वास्तविक पाहता रस्त्या लगत असणा - या नागरिकांनी एन.ए. लेआऊट करत असताना सर्विस रोड सोडला होता .ती सर्विस रोड साठी सोडलेली जागा.सदर जागा मालकांनी नगर परिषदेला नाम मात्र किमतीत मालकी हक्काने लिहून दिलेली होती . सदर जागा नगर परिषदेच्या मालकीची होती . ती नॅशनल हायवे अॅथोरटीला विना मोबदला मिळालेली आहे . तरी देखील नॅशनल हायवे ॲथोरटी व आय . आर . बी . सदर रस्त्या लगत सर्विस रोड ची सेवा देण्यास तयार नाही . खर मंजे सदर गंभीर प्रकरणामध्ये आय . आर.बी. यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करणे अपेक्षित होतं स्नेह विकास सोसायटी परंतू दुर्दैवाने तसे झाले नाही . ज्या कामासाठी नगर परिषदेने जमीन घेतली त्या कामाचा उद्देश साध्य न करता इतर प्रयोजनासाठी जमीन वापरणे . एक गुन्हा व सदर गैरसोई मुळे नागरिकांचा जिव गेला त्या बाबत 302 चा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे . सदर विषया संबंधी आम्ही खासदार श्री . ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब व आय.आर.बी व नॅशनल हायवे अॅथोरटी अधिका -यां समवेत तीन वेळेस बैठक घेऊन सदर विषय मार्गी लावण्यास विनंती केली . प्रत्येक बैठकी वेळी पुढच्या महीन्यात काम सुरू करू असे आश्वासन देण्यात आले परंतु अद्याप पर्यंत काम सुरू झाले नाही . सदर रस्त्या वरती आय.आर.बी. मार्फत टोल वसुली देखील सुरू आहे . परंतू नागरीकांची सोय मात्र केली गेली नाही . त्यामुळे शहर वासीयांच्या वतीने येत्या 15 दिवसात सदर महामार्गावर सर्विस रोडचे काम सुरू होत नाही . तो पर्यंत सदर रस्ता कायम बंद ठेवण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे . सदर आंदोलना मुळे होण्या -या नुकसानीस आय.आर.बी. व नॅशनल हायवे अॅथोरटी जबाबदार असतील . तरी विनंती की , वरील बाबींचा विचार करून आपल्या स्थरावर योग्य ते आदेश देऊन नागरीकांची गैरसोय टाळावी अशी निवेदनाद्वारे मागणी उस्मानाबाद नगरपरिषद नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन देत केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top