उस्मानाबाद :- तालुक्यातील पाडोळी(आ),टाकळी , मेंढा , घुंगी, समुद्रवाणी, लासोना, सांगवी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ .प्रतापसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांसोबत पाहनी करून तात्काळ पंचनामे करण्यासाठी संबंधित आधिकार्यासोबत चर्चा केली.
यावेळी सतिश काका एकंडे, वामन गाते ,अजित पवार ,प्रशांत सोनटक्के ,शिवशांत काकडे ,मनोज सावंत ,शेषेराव सोनटक्के ,रवी सोनटक्के, हनुमंत बर्डे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.