धरणातून मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज वाहूनगेल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी : महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0



धरणातून मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज वाहून
गेल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी : 
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीने धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेगाने विसर्ग झाल्याने मासे व मत्स्यबीज वाहून गेले आहे. यामुळे मच्छिमार सहकारी संस्था व मच्छिमारी करणार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून मत्स्य व्यवसाय अडचणीत आलेला आहे. अशातच जिल्ह्यात चालू वर्षात अनेकवेळा अतिवृष्टी होऊन होऊन धरणे तुडूंब भरून पाण्याचा विसर्ग वेगाने मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे धरणामधील मासे, मत्स्यबीज पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहे. यामुळे मच्छिमार सहकारी संस्था व मच्छिमारी करणारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे पुर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या प्रमाणे धरणांचे पंचनामे करून मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात आली, त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर मच्छिमार संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सल्ले, उपाध्यक्ष भारत नगरे, सचिव नितीन कंचे, कोषाध्यक्ष मोतीराम नगरे यांच्या सह्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top