प्रहार जनशक्ती पक्ष उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक संपन्न
उस्मानाबाद :- आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात नेऊन जनतेच्या कामातून पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटना मजबूत करणे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे यांचे अध्यक्षतेखाली बैठक उस्मानाबाद येथे जत्रा हॉल मध्ये संपन्न झाली
यामध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांनी तीन दिवसांपासून सुरू केलेल्या मराठवाडा दौऱ्यात सोमवारी शेवटची आढावा बैठक उस्मानाबाद येथे झाली. गेल्या दोन वर्षांपासून या जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त असली तरी अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य मयूर काकडे व त्यांच्या सहकाऱ्यार्नी या जिल्ह्याचा संघटनात्मक किल्ला योग्यप्रकारे लढविला. सोमवारच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊंनी मयुर काकडे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.
जिल्हाभरातील पदाधिकारी , कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामान्य माणसाला न्याय देण्याचा मा. बच्चूभाऊंचा हा लढा सर्वानी असाच नेटाने सुरू ठेवावा असे आवाहन अनिलभाऊंनी याप्रसंगी केले. मयूर काकडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यात आली. याठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांनी अनिलभाऊ व उपस्थित सर्वांचाच सत्कार करण्यात आला. यावेळी अकोल्याचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुधाकर खुमकर, गोपाल जळमकर, तेल्हारा तालुकाध्यक्ष मुन्ना बिहाडे, अमोल जवंजाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्व तालुक्यांमधील प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार सैनिक व तालुक्यातील शाखा प्रमुख उपस्थित होते. यामध्ये
प्रमुख उपस्थिती, जिल्हाध्यक्ष मयुरजी काकडे उपजिल्हा बाळासाहेब पाटील,जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील,शहराध्यक्ष जमीर शेख,शशिकांत मुळे,महादेव चोपदार,मारुती पाटील, नागेश कुलकर्णी,शिवाजी पोतदार,दिनेश पोतदार, राचय्या स्वामी,सुरज आबाचने, बसवराज मसरे, सुनिल ठोंबरे, प्रहार जनशक्ती तालुका उपाध्यक्ष भूम, गणेश ठोंबरे तालुका संपर्कप्रमुख,अमोल कांबळे शाखा अध्यक्ष भवानवाडी टेंबाई दीपक बोडके मदर डेअरी चेरमन ,नाना कांबळे,अशोक ठोंबरे,भरत कांबळे,दादा ठोंबरे,निखिल कांबळे,सचिन कांबळे,जीवन कांबळे,सागर ठोंबरे अमोल येळे,प्रहार शेतकरी संघटना बसवराज मसरे तालुकाध्यक्ष , केदार सौदागर,मनोज जाधव,जुबेर शेख, दयानंद राठोड ,बाबासाहेब भोईटे,वासुदेव काशीद,दत्ता पवार,संजय शिंदे,सिंदराम पवार,हेमंत उंदरे,सुरज उंदरे,नवनाथ कचार
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली व श्री अनिलजी गावंडे यांनी पुढील रणनीतीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी पक्षीय फेरबदल व संघटना वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील असावे असेही यावेळी सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल जी गावंडे होते प्रसंगी अध्यक्षीय भाषणात गावंडे साहेब बोलत होते की संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये आढावा बैठका पार पडत आहे परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात तालुक्यात प्रहारचे काम अतिशय तळमळीचे व धडाडीचे आहे त्यामुळे आगामी निवडणूक काळात खास करुन आमचे लक्ष सर्व तालुकावर असणार आहे. यांच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु जास्तीत जास्त वेळ आम्ही व ना. राज्यमंत्री बच्चू कडू साहेब लक्ष देतील असे यावेळी म्हणाले प्रसंगी कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह यावेळी दिसला यावेळी उपस्थितांमध्ये असंख्य प्रहार सैनिक शाखाप्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले,आभार बाळासाहेब कसबे यांनी तर सूत्रसंचालन महेश माळी यांनी केले.