जनजनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

0





उस्मानाबाद - जनहित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सन २०२०-२१ आणि २०२१-२२ ची पुर्ण अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम घोषित केल्यानुसार हेक्टरी दहा हजार रूपये प्रमाणे द्यावी,सन २०२०-२१ खरीप,रब्बी,पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी,सन २०२१-२२ चा खरीप विमा शासनाच्या टक्केवारी नुसार जमा करावी,कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सन २०२०-२१-२२ चा सरसकट विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी या मागण्या आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top