उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील ३१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद , निवडणुकीत ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज

0
धाराशिव दि. 07 (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 7 मे रोजी 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या निवडणुकीत उभ्या असलेल्या 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले.आज झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे होणार आहे. 

मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती.कडक ऊन लक्षात घेता काही मतदारांनी सकाळी तर काही मतदारांनी सायंकाळी पाच वाजतानंतर मतदान करण्याची वेळ निवडली.त्यामुळे सायंकाळी 6 वाजतानंतर देखील काही मतदान केंद्रावर मतदान सुरू होते.वोटर टर्न आउट अँपवरील माहितीनुसार 60.41 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.औसा - 61.65 टक्के,बार्शी - 64.95 टक्के,उमरगा -64.76 टक्के, उस्मानाबाद - 60.21 टक्के,परंडा - 59.35 टक्के आणि तुळजापूर -61.32 टक्के असे मतदान झाले.मतदानाची टक्केवारी 60.41 इतकी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top