स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजपा कडून स्वतंत्र सैनिकांचा सत्कार संपन्न..
उस्मानाबाद : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने हिंदुस्थानला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर कित्येकांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं, कित्येकांना तुरुंगात डांबलं गेलं, ब्रिटिशांकडून अनन्वित अत्याचार करण्यात आले, परंतु तरीही भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण तळहातावर घेत लढा दिला व 15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळाले. या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्या सर्व शहिदांचे स्मरण करण्यासाठी व सध्या हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, विष्णुपंत धाबेकर, चनाप्पा उटगे, शेषेराज बनसोडे, बुबासाहेब जाधव या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सौ. अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नेताजी पाटील,दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड. अनिल काळे, , ॲड.नितीन भोसले, विजय दंडनाईक, राजसिंहा राजे निंबाळकर, प्रदिप शिंदे, सुनील काकडे, अभय इंगळे, राहूल काकडे,विनोद गपाट, ॲड. कुलदीपसिंह भोसले, राजाभाऊ कारंडे, संग्राम बनसोडे, दत्ता पेठे, बापू पवार, मोहन मुंडे, राजेश परदेशी, जगदीश जोशी, श्रीराम मुंबरे, प्रमोद बचाटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयोजक नगरपालिकेचे माजी गटनेते युवराज नळे यांनी उपस्थित सर्व स्वतंत्र सैनिकांची व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याविषयीची माहिती विषद केली व कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.