मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेल्या शेतकऱ्यांना डॉ तानाजी सावंत यांच्याकडून मदत
नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार सिताबाई सुरवसे यांना दहा लाख तर टरबूज उत्पादक बाबासाहेब उंबरदंड शेतकऱ्यांना दोन लाखाची मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव दौऱ्यावर गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली होती नुकसानीची पाहणी
पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यासमोर सावंत यांनी दिले होते मदत करण्याचे आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी दोन दिवसांपूर्वी केली होती मुख्यमंत्री यांनी भेट दिलेल्या शेतकऱ्यांना तानाजी सावंत यांच्याकडून 12 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी तुळजापूर तालुक्यातील मोरडा गावातील द्राक्ष बागायतदार सिताबाई सुरवसे यांच्या द्राक्ष बागेला भेट दिली होती सीताबाई यांची पूर्ण द्राक्ष बाग गारपीट ने उदवस्त झाली होती मुख्यमंत्री व तानाजी सावंत पाहणी करण्यासाठी आले असता या महिलेने हंबरडा फोडत आता आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही मदत करा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली असता मी माझ्या कडून वैयक्तिक दहा लाख मदत करण्याचे आश्वासन डॉ तानाजी सावंत यांनी दिले होते त्यावर आज सावंत यांनी सीताबाई सुरवसे यांना दहा लाख रुपये तर टरबूज उत्पादक शेतकरी बाबासाहेब उबरदंड यांना दोन लाखाची मदत दिली असून मुख्यमंत्री बांधावरून परतून दोनच दिवसात मदत मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री डॉ तानाजी सावंत शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.यावेळी उपस्थित मा.जि.प उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत ,अनिल खोचरे ,दत्ता बापू मोहिते ,गौतम लटके सर ,धनंजय पाटील , शेतकरी बांधव व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते