सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा द्या. - आमदार राणाजगजितसिंह पाटील
मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी.
उस्मानाबाद, दि. २७ - उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गामुळे देशातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी वैजिनाथ या रेल्वेमार्गाप्रमाणे
राज्यातील आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत उस्मानाबाद आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी याकरिता मागील तीन दशकांपासून सोलापूर-जळगाव रेल्
या मार्गातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद असा नवा रेल्वेमार्गाचा प्रस्ताव हा पहिला टप्पा म्हणून पुढे आला. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेबांनी राज्यातील साडेतीन पीठांपैकी एक असलेले तुळजापूर हे धार्मिक पर्यटन क्षेत्र रेल्वेच्या नकाशावर आणण्याबाबत घोषणा केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव २२ जुलै २०१८ रोजी मंजूर केला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या २०१८-१९ च्या नियोजनात देखील नव्या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. असेही आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सोलापूरहून तुळजापूर मार्गे उस्मानाबादला जाणार्या ८४.४४ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी रुपये ९०४.९२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. देशातील उस्मानाबादसारख्या आकांक्षित जिल्ह्याच्या विकासाला या रेल्वेमार्गामुळे मोठी चालना मिळणार आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी वैजिनाथ या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी ५०% हिस्सा राज्य सरकारकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याने मंत्रिमंडळ स्तरावर घेतलेला आहे, त्यानुसार सदर मार्गाकरिता राज्याने निधी उपलब्ध करून दिल्याने या मार्गाचे काम गतीने झाले व ते आता पूर्णत्वाकडे जात आहेत. याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान असलेल्या तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेमार्गाशी जोडण्याकरिता सोलापूर-तुळजापूर-
उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे व भौगोलिक रचनेमुळे इथे सतत दुष्काळी परिस्थिती असते. या परिसरात उद्योगधंदे नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण आहे. इथल्या विकासाला चालना देण्यासाठी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या आपल्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी यावेळी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या तुळजापूर शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी, या भागाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या ८४.४४ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठीच्या रुपये ९०४.९२ को