तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणी सुरू
तुळजापूर:- भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आ. जीवन रेड्डी , शकंर अण्णा धोडंगे , मा. खासदार हरी भाऊ राठोड , मा.प्रविण जेटेवार , मा. सुधीर बिदूं मा. हिमानुशी तिवारी,मा.माणिक कदम, मा. प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील आणदुर , फुलेवाडी , फुलवाडी 2ताडा , धनगर वाडी , सोमलीग नगर , येथे प्रत्यक्ष शेतकरी, नागरिक, युवकांची भेट घेऊन "भारत राष्ट्र समिती" पक्षाचे ध्येय, धोरण, काम, यांची सुनील चव्हाण व त्यांच्या टीमने माहिती दिली..
गावातील प्रमुख चौकात पक्षाचे झेंडे, बनर लावून "भारत राष्ट्र समितीचे " मोठ्या प्रमाणात सभासद करून घेतली पक्ष नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.