भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद
तुळजापूर:- भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आ. जीवन रेड्डी , शकंर अण्णा धोडंगे , मा. खासदार हरी भाऊ राठोड , मा.प्रविण जेटेवार , मा. सुधीर बिदूं मा. हिमानुशी तिवारी,मा.माणिक कदम, मा. प्रशांत नवगिरे , थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील शिरगापुर दलित वस्ती, ईटकळ, बाबळगाव दलित वस्ती , बाबळगाव केरळ, शिरगापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष शेतकरी, नागरिक, युवकांची भेट घेऊन "भारत राष्ट्र समिती" पक्षाचे ध्येय, धोरण, काम यांची सुनील चव्हाण व बळीराम हिप्परगे, संतोष जाधव, असीम जागीरदार नळदृग शहर कमिटी युवक लीडर ,
त्यांच्या टीमने माहिती दिली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माहा पुरुषांना अभिवादन करुन सर्व गावात सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली यावेळी अरविंद घोडके ,सुरज बचाटे, वेंकट राठोड ,संदीप राठोड, संजय राठोड, ऋषी चव्हाण, अनिकेत राठोड, पृथ्वी चव्हाण, सुनील गंगणे, अभिषेक पवार, अंकुश पाटील, सुधाकर राठोड, मशक बागवान उपस्थित होते. गावातील प्रमुख चौकात पक्षाचे झेंडे, बनर लावून "भारत राष्ट्र समितीचे " जवळपास मोठ्या प्रमाणात सभासद करून घेतली पक्ष नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.