भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला तुळजापूर तालुक्यात मोठा प्रतिसाद
तुळजापूर:- भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आ. जीवन रेड्डी , शकंर अण्णा धोडंगे , मा. खासदार हरी भाऊ राठोड , मा.प्रविण जेटेवार , मा. सुधीर बिदूं मा. हिमानुशी तिवारी,मा.माणिक कदम, मा. प्रशांत नवगिरे , थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील माने वाडी , चिवरी, बालाजी नगर, गणेश नगर येथे व रमाई महिला बचत गटाच्या महिलांनी देखील भारत राष्ट्र समिती सदस्यत्व स्वीकारले आहे.
प्रत्यक्ष शेतकरी, नागरिक, युवकांची भेट घेऊन "भारत राष्ट्र समिती" पक्षाचे ध्येय, धोरण, काम यांची सुनील चव्हाण व , अरविंद घोडके, सुरज बचाटे ,असीम जागीरदार नळदृग शहर कमिटी युवक लीडर , त्यांच्या टीमने माहिती दिली व पक्षाची सदस्य नोंदणी केली.
यावेळी रमाई महिला बचत गट नळदुर्गच्या त्रिशला बनसोडे, प्रमिला बनसोडे, शिल्पा गायकवाड, आशा बनसोडे, निकिता कांबळे, रमाई बनसोडे, व इतर 30 महिलांनी सदस्य नोंदणी केली व गणेश राठोड ,विजय राठोड, सुधाकर राठोड, रवी पवार, मनोज राठोड , संजय राठोड, रेहू राठोड, बाबू चव्हाण, सतीश राठोड, कांत राठोड, व इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक गावातील प्रमुख चौकात पक्षाचे झेंडे, बनर लावून "भारत राष्ट्र समितीचे " मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्यात आली पक्ष नोंदणीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रतिसाद मिळत आहे.